अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा 7057283888
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील हातपंप बंद पडल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती.
अककलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अरेढी व केवडीच्या पाड्यावरील हातपंपाची पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंप बंद पडले असुन या पाड्यावरील महिलांना पाण्यासाठी भटकंती करीत नदीच्या झि-यातून पाणी आणावे लागत आहे. तरी या पाड्यावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच कायम स्वरूपी विहीरीना मंजुरी देवुन विहीरीचे काम सुरू करून पाण्याची सोय करावी अशा मागणी चे निवेदन गटविकास अधिकारी अककलकुवा यांना भाजपाचे अककलकुवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी केली आहे.
अककलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या अरेढीच्या बोरव्हीपाडा येथे दोन हातपंप असुन ,पाटीलपाडा येथे दोन, निंबीपाडा येथे दोन असे हातपंपाची पाण्याची पातळी खाली गेल्याने ते बंद पडले तर राहपाडा येथे तीन हातपंप असुन त्या हातपंपाचे पाणी खराब निघत असल्याने ते पिण्यायोग्य नसल्याने यांना देवनदिवरील झिर्यातुन भटकंती करीत पाणी आणावे लागते तसेच माथाचापडी येथे चार हातपंप असून ते आटले.
केवडीच्या बाराआबांपाडा येथे तीन व केवडीच्या पाथाईपाडा येथील दोन असे हातपंपाची पाण्याची पातळी खाली गेल्याने ते बंद पडल्याने या पाड्यांवरील नागरीकांना महिलांना पाण्यासाठी भटकंती करीत नदिच्या झ-यातून पाणी आणावे लागत आहे. तरी या पाड्यांवरील नागरीकांना महिलांना पाण्यासाठी सोय करावी व कायमस्वरूपी पाण्यासाठी विहीरी मंजुर करून त्यांना कायमस्वरूपी पाण्याची सोय करावी अशी मागणी गटविकास अधिकारी याच्याकडे भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.