शिक्षकच समाजाचे नेतृत्व करू शकतो व मनापासून समाजात शिक्षण प्रसाराचे काम शिक्षकांनी करण्याचे प्रतिपादन जामिया संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मौलाना वस्तानवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
अक्कलकुवा येथील जामिया शिक्षण शास्त्र महाविद्यालयात द्वितीय वर्षातील विद्यार्थी शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामिया संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मौलाना वस्तानवी तर प्रमुख वक्ते राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा, एजाज मक्राणी हे उपस्थित होते.
जामिया शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी ए. पटेल यांनी शिक्षण शास्त्र महाविद्यालय सुरू झाल्यापासून आतापर्यंत असलेल्या प्रगतीच्या आढावा यावेळी दिला. सन 2004 पासून तर आतापर्यंत बाराशे साठ विद्यार्थी या महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी वर्षभरात उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांच्या यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जामिया शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य साजिद पिंजारी, प्रा. सरिता पाडवी, प्रा. आशिष वसावे ,प्रा मोहसीन पठाण, प्रा. तोसिफ अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सोनी गावित, विश्वास पाडवी, माजेदा शेख, जुबेर शेख या विद्यार्थी शिक्षकांनी मनोगतातून दोन वर्षातील अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पराडके तर आभार कविता पवार यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकाश वसावे ,करण सिंग वसावे ,पंकज वळवी ,अश्विन राऊत यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.