Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोकप्रतिनिधी असावा तर असा - कार्यसम्राट, विकास पुरुष, आरोग्यदुत, कर्मयोगी, आमदार राजेश पाडवीं सारखा

लोकप्रतिनिधी असावा तर असा...
सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि ५

        देशासह राज्यासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वानी अनुभवले की, शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये विस्थापित होणाऱ्या नागरिकांची, शेतमजूरांची, कामगारांची संख्या अधिक होती. ह्या विस्थापितांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले. यामध्ये काही राजकारणी होते, तर काही समाजसेवक होते. परंतु समाजसेवेची प्रबळ इच्छा असलेला आणि माजी पोलीस निरीक्षक असलेला एक लोकप्रतिनिधी देखील ह्या काळात आपल्या लोकांच्या मदतीला आवश्यक त्या ठिकाणी धावून गेला! त्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली. त्यांना खाण्यापिण्याचे साहित्य पुरवले आणि ह्या काळात २७,००० गरजू नागरिकांना आपापल्या घरी पोहोचवले. परंतु त्याची कुठेही जाहिरातबाजी केली नाही. केवळ काम केले! असा लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात आहे! याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. ह्या लोकप्रतिनिधीचं नाव आहे, शहादा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पाडवी!

       "राजकारण हे समाजसेवेचे एक माध्यम आहे", असे म्हणतात. त्यामुळे केवळ समाजसेवेच्या हेतूने मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकपदाची आपली २७ वर्षांची नोकरी सोडून राजकारणात आलेल्या राजेश पाडवी यांनी, लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण लॉकडाऊनच्या काळात दाखवून दिले आहे.

        शहादा तालुक्यातील अडगाव, दुधखेडासह इतर गावांमधील काही मजूर बांधव आपले पोट भरण्यासाठी गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील धोराजी (ता. जमनावड) येथे गेले होते. तर काही मजूर नवसारी जिल्ह्यातील गनदेवी व भरूच जिल्ह्यातील पंडवाई येथील साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते. परंतु लॉकडाऊनच्या काळात त्यांची गावाकडे परतण्याची व्यवस्था होऊ शकत नव्हती, अशा परिस्थितीत त्यांनी मदतीसाठी आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तात्काळ गुजरातच्या स्थानिक प्रशासनास याबाबत माहिती देऊन, खाजगी ट्रॅव्हल्स, टेंपो व ट्रॅक्टरच्या माध्यमातून ह्या मजूरांना त्यांच्या सामाना सकट गावाकडे परत आणले. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे साखर कारखान्यातील त्यांचा अडकलेला १३.५ कोटी रुपयांचा पगार देखील त्यांना मिळवून दिला. ५० पेक्षा अधिक गाड्या पाठवून पगाराची ही रक्कम आणण्यात आली. आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीने मजूर बांधवांना त्यांच्या हक्काच्या पगाराचे वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे शेजारील राज्यांमधून (गुजरात/मध्यप्रदेश) ज्यांना महाराष्ट्रात परत यायचं आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, असे आवाहन देखील याकाळात करण्यात आले होते. ह्याच काळात पोरबंदर, जुनागड, भावनगर, राजकोट ह्या जिल्ह्यांमधून शेत मजूरांना परत आणण्यात आले, यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या गरोदर महिलांची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच शेत मजूर व कामगारांच्या जेवणाची तसेच आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली.

सुरत येथून २० ते २५ मजूर पायी आपल्या गावी उत्तरप्रदेशला जात आहेत, हे समजल्यानंतर त्यांची देखीलं योग्य व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्राच्या शेजारीलं मध्यप्रदेशमधून देखील काही मजूरांना परत आणण्यात आले. गुजरातच्या सीमेवरून १५०० पेक्षा जास्त बिहारी मजूरांना टेंपो व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आले. (अशी इतरही काही उदाहरणे देता येतील.)

या काळात शहादा मतदारसंघातून रस्त्यांच्या मार्गे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांत जाणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना व मजूरांना देखील मदतीचा हात देण्यात आला. त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. परंतु हे काम करत असताना कुठेही गवगवा केला नाही अथवा जाहिरातबाजी केली नाही. त्यामुळेच आजवर एकूण २७,००० नागरिक, विद्यार्थी व मजूरांना मदत करण्याचे भाग्य राजेश पाडवी यांना लाभले आहे आणि हे काम विविध माध्यमातून अजूनही सुरु आहे.

आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर समाजोपयोगी कामे करण्यावर अधिक भर दिला, विशेषतः स्थानिक वनवासी बांधवांसाठी काम केले.
अडचणीत असलेल्या नागरिकांना वेळोवेळी मदत केली, आरोग्य सुविधा पुरवली, तसेच त्यांचे इतरही स्थानिक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळेच ते आज एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकत आहेत.

लोकप्रतिनिधी हा सरकार आणि जनता यांमधील एक दुवा म्हणून काम करत असतो, याची जाणीव असलेल्या राजेश पाडवी यांनी केवळ मागच्या ८ ते ९ महिन्यांमध्ये अनेक स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये आता कामगारांसह स्थानिकांना मोफत धान्य वाटप करणे, रेशनकार्ड आधारकार्ड संलग्न करणे, मनरेगा योजनेचा लाभ मिळवून देणे, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, योग्य व गरजू व्यक्तींसाठी आवास योजना आमलात आणणे यासह महत्त्वाच्या विषयांवर काम सुरु केले आहे. तसेच ह्या कामगार बांधवांचे परत स्थलांतर होऊ नये, यासाठी स्थानिक उद्योजकांना आवाहन करून त्यांना मजूर उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील एक सामान्य नागरिक म्हणून असे वाटते, की राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे लोकप्रतिनिधी खूप कमी असतात. त्यातच जनतेच्या मदतीला अहोरात्र उभे असणारे आमदार तर बोटावर मोजण्याइतकेच असावेत. आणि या सर्वांमध्ये आमदार राजेश पाडवी यांनी हाती घेतलेले हे काम नक्कीच सोपे नाही, त्यामुळे त्यांनी चालवलेल्या या समाज कार्यामुळे असे वाटते, की लोकप्रतिनिधी असावा तर असा... ज्यामुळे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र चिंतामुक्त होईल.