नंदपुर गावालगत रंकानदीच्या पात्रातून होडी किंवा दोराच्या साह्याने नदीच्या पलीकडे असलेल्या समस्शानभुमीकडे मृतदेह घेऊन जातांना अनेक अडचणीचा सामना करत करावा लागल्याने गावकऱ्यां प्रशासनबाबत असंतोष निर्माण झाला असून सोशल मीडियावर आश्चर्य व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असताना दुसरीकडे आदिवासी पाड्यात आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आहे. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्हातील पश्चिम पट्यातील धानोरा गृप ग्रामपंचायतेतून नंदपुर (जोगणीपाडा) ह्या गावाचे विभाजन १९८० यावर्षी झाले. तेव्हापासून नंदपुर स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. तब्बल ४३-४४ वर्ष उलटून ही गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी फरशी किंवा लहान मोठा पुलाअभावी पावसाळ्यात तापी नदीचा फुगवट्याचे पाणी नंदपुरपर्यंत येते. गावालगत रंकानदी बारमाही वाहणारी असल्याने नदीपात्रात पाणी राहते. नदीपलीकडे गावकऱ्यांची शेती, स्मशानभूमी असल्यामुळे शेतकरी महिला, मजूरांना तसेच मृतदेह घेऊन जाण्यासाठी पाण्यातून वाट काढून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्याचप्रमाणे यंदा पावसाने कहरच केला. दोन महिण्यापासून पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने रंकानदीला पूर आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी मृतदेह स्मशानभूमीला नेण्यासाठी पडत्या पाण्यात होडीचा वापर केला. नदीच्या पलीकडे मृतदेहाला घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच प्रेतयात्रेत जाण्यासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, आबालवृद्ध आदिंना दोरीच्या साह्याने नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
नटावद गावात धरण बांधण्यात आले असल्याने धरण भरले गेले केव्हाही पाणीचा स्त्रोत वाढू शकतो. त्यामुळे जिवीतहानी होण्यांची शक्यता नाकारता येत नाही. शासन अजून आमची किती अवहेलना करणार आहे. आम्हाला शेती व्यवसाय करायला अडचण, शेतीला लागणारे साहित्य खत, फवारणी, मशागत करणे अवघड गावात कुणी मयत झाला तरी अडचण अश्या अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने रंकानदीला पुल लवकरात लवकर बांधण्यात यावा व आमच्या अडचणीचा पाठपुरावा व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थ करीत आहेत. शासनाचे दुर्लक्षितपणामुळे अनेक वर्षापासून अशा जीवघेणा प्रवास करतोय. आता तरी आमचा अंत पाहू नका व लवकरात लवकर रंकानदीवर पूल बनवावा, अशी मागणी सरपंच नितेश वळवी, उपसरपंच अशोक नाईक, ग्रा.प. सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे.जिल्हयात नदीच्या पाण्यातुन गरोदर महिलेला झोळीतुन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, विद्यार्थ्यांना मानवी साखळी करून शाळेत पोहचवले या घटना भयावह,व प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारे होते,आता प्रेतयात्रा नदीच्या पाण्यातुन काढावी लागली हे तर प्रशासनाची अंत्ययात्रा काढावी इतकी भयंकर आहे.