Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

युवकांनी समाजसेवा व राष्ट्रसेवेला प्राधान्य द्यावे- मेजर किशोर पाटील

युवकांनी समाजसेवा व राष्ट्रसेवेला प्राधान्य द्यावे- मेजर किशोर पाटील
नंदुरबार दि २२(प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जिजामाता शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोदा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी सैनिक मेजर किशोर आत्माराम पाटील यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.युवकांनी समाजसेवा व राष्ट्रसेवेला प्राधान्य द्यावे. मला समाजाने काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो या भावनेने युवकांनी कार्यरत राहावे असे प्रतिपादन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
 राष्ट्रीय सेवा योजनेचे आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. दादाभाऊ सोनवणे यांनी बौद्धिक सत्रात राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे महत्त्व, हेतू व उद्दिष्टे आपल्या व्याख्यानातून स्पष्ट करताना सांगितले की, तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून होत असतो. तर प्रमुख अतिथी डॉ. देविदास सोनवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून संस्काराची शिदोरी मिळत असते विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेचे महत्व व आपल्या कर्तुत्वाला प्राधान्य द्यावे असे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी "युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या टॅगलाईनचे स्पष्टीकरण व महत्त्व आपल्या अध्यक्षीय भाषणातून विशद केले. संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शोभाताई मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, उपाध्यक्ष डॉ विक्रांतबाबा मोरे, ॲड
राऊबाबा मोरे व प्राचार्य डॉ सतीश देवरे यांच्या मार्गदर्शनाने वाघोदा ग्रामपंचायत येथे शिबिराचा अभूतपूर्व उद्घाटन सोहळा पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप भदाणे यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश वळवी, प्रा. श्रीमती सोनाली तेले, प्रा.विद्या शिंदे प्रा. त्रिवेणी पवार, श्री संतोष लोहार व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. वाघोदा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सहकार्य केले.*