दि ६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५ संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात अंमलबजावणी!- जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी डॉ. मिताली सेठी
नंदुरबार दि ६ (प्रतिनिधी) आगामी शिवजयंती उत्सव , दहावी-बारावीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने १४ दिवसांसाठी गर्दी आणि शस्त्रे बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम ३७ (१) (३) मध्ये आदेश जारी केले आहेत.
क्रमाने महत्वाचे नियम:- शस्त्रास्त्रे, तलवार, काठ्या, बंदुका किंवा कोणतेही प्राणघातक हत्यार बाळगण्यास मनाई. गर्दी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी. मिरवणुका आणि घोषणा कोणत्याही प्रकारच्या मोर्चा किंवा भाषणांवर निर्बंध.
विशेष सवलती:- वृद्ध आणि अपंग व्यक्ती काठ्या वापरण्याची परवानगी.सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कामांसाठी शस्त्र बाळगण्याची संधी.
लग्न, अंत्यसंस्कार आणि आठवडी बाजार सवलती.
जिल्ह्यात कडक अंमलबजावणी- आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
स्थानिक पोलिस विभाग योग्य ती कारवाई केली जाईल.
नागरिकांनी शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन:- नियमांचे काटेकोरपणे पालन करा
विद्यार्थ्यांसाठी शांततापूर्ण वातावरण निर्माण करा
सामाजिक जाणीव ठेवा