नंदुरबार दि ७ (प्रतिनिधी) देशभरात १ जुलै २०२४ पासून नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS), आणि भारतीय पुरावा कायदा (BSA) असे तीन कायदयांचा समावेश आहे. नवीन लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायदयांमध्ये काही कलमे हटविण्यात आली असुन काही कलमांचा नव्याने समावेश देखील करण्यात आला आहे.
सदर कायदयांमध्ये नवीन कलमांचा समावेश केल्यानंतर समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींना त्याबाबत संभ्रम निर्माण होऊ नये व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उददेशाने महाराष्ट्र शासनाचे 100 दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत नंदुरबार तालूका पोलीस ठाणेतर्फे दि. ६/२/२०२५ नवीन फौजदारी कायदयाचे जनजागृती कार्यशाळेचे जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचे हस्ते नवीन फौजदारी कायदे विषयक जनजागृती कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्य लोक अभिरक्षक, जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार अॅड. श्रीमती सिमा खत्री यांनी उपस्थितांना नवीन कायदयांचे वावत माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केले, सदरवेळी प्राचार्य श्री.एन.डी.चौधरी, विधी महाविद्यालय, नंदुरबार, प्राचार्य एम.जे. रघुवंशी, जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार, प्राध्यापक सनी हसनानी, विधी महाविद्यालय, नंदुरबार, समन्वयक रघुवंशी, जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार, उपविभागीय पोलीस अधिकारी . संजय महाजन, नंदुरबार उपविभाग, नंदुरबार तालूका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल भावड, महिला सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथील पोउपनि माया राजपूत, डॉ. सयाजी मोरे यांचे विशेष उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमात नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, गावकरी, जी.टी.पी. महाविद्यालय व उच्च महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार तसेच प्रतिष्ठीत नागरीक असे उपस्थित होते.