तळोदा दि २१(प्रतिनिधी) तालुक्यातील रापापुर , चौगांव, कुयली डांबर, लक्कडकोट येथे वादळी वाऱ्यासह गारपीट मुळे नुकसान ग्रस्त भागाची आमदार राजेश पाडवी व तहसीलदार गिरीश वखारे यांनी तात्काळ भेट देत पहाणी केली प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचा सूचना दिल्या.कूयली डाबर येथे २६ शेळ्यांचा पावसाच्या मार ने मृत्यू झाला आहे.
तालुक्यात रापापुर, चौगांव व परिसरातील गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मुळेतसेच काही भागात गारपीट झाली वादळाने ३५ घरे पडझड, कुटुंबांचे नूकसान,विजेचे खांबांचे नूकसान, पिकांचेही मोठं नुकसान झाले आहे आमदार राजेश पाडवी यांनी भेट देऊन पहाणी केली यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, पंचायत समिती माजी सभापती यशवंत ठाकरे, सरपंच जोलू पाडवी, रुंदा पाडवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी प्रशासनास तात्काळ पंचनामे करावीत अशा सूचना दिल्या.
दि २०रोजी वार शनिवार तालुका तळोदा गृप ग्राम पंचायत रापापुर अंतर्गत कुयली डाबरी या गावातील रहिवासी पाच्या रोडत्या वसावे यांच्या 19 बकऱ्या तसेच मगन हाण्या वळवी यांच्या 4 बकऱ्या तसेच विजय हुरमा वसावे यांच्या 3 बकऱ्या एकूण 26 बकऱ्या आजच्या अवकाळी पाऊस व चक्रीवाळामुळे ह्या मरण पावल्या तरी या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकप्रतनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवाजी तडवी अध्यक्ष बिरसा फायटर रापापुर व पाल्हाबार यांनी केली आहे.