Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा येथे नऊ लाखांचे सोन्याची दिवसा ढवळ्या घरफोडी पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान, परिसरात भितीचे वातावरण

तळोदा दि २३(प्रतिनिधी)शहरातील  गोपाळ नगरमध्ये सुनील पूंडलिक मगरे यांच्या घरची खिडकी उचकटून दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी यांत जवळपास दहा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.
           शहरात भरवस्तीत चोरट्यांनी  दिवसा ढवळ्या घरफोडी करून पोलिसांसमोर आव्हान उभे करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या चोरीत भविष्यात मुलीचा लग्नासाठी घेतलेले व कौटुंबिक हिस्से वाटणीत मिळालेले सोळा तोळे सोन्याचा समावेश असल्याने चोरीची रक्कम लाखोंच्या घरात असल्याचे कुटूंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांपुढे चोरट्यांना जेरबंद करण्याचे चॅलेंज आहे.
             सोमावल येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक  सुनील मगरे शाळेत गेले असतांना त्यांचा गोपाळ नगर येथील घरात चोरट्यांनी घुसून दिवसाढवळ्या हात साफ केल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि ,  गुरुवार दिनांक २२ रोजी दुपारी ३ ते ४ वाजे दरम्यान घराच्या मागील बाजूची किचनची खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यात बेडरूम मध्ये असलेले दोन कपाट फोडून चोरट्यांनी सर्व सामान अस्तव्यस्त केले. त्यावेळी कपाटातील लाॅकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने ६ तोळे गळ्यातील पोत ,४ तोळ्यांच्या छडा, भविष्यात मुलीचा लग्नासाठी केलेली तजवीज म्हणून घेतलेले ६ तोळे सोने ,४ ग्रॅमचे मणी तसेच चांदीचे १५ तोळे दागिने,काही रोख रक्कम असा सुमारे ९ लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. त्यामुळे कुटूंबियाचे मोठे नुकसान झाले आहे.
            भविष्यात मुलीचा लग्नासाठी केलेली तजवीज देखील गेल्याने कुटूंबियानी भविष्यातील स्वप्नावर पाणी फिरले आहे . यात मगरे कुटुंबातील सदस्य मोठा माळी वाड्यातील त्यांचे मोठे बंधूकडे गेले होते. मात्र काही कामानिमित्त घरी आल्यावर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले.त्यामुळे मगरे कुटूंबाचा आयुष्यभराची कमाई नेली आहे.सदर घटना तातडीने पोलिसांना कळविल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल , पोलिस नाईक अजय पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. नंदुरबार येथून श्वानपथक मागवून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला  मात्र अपयशी ठरला,रात्री उशिरा पर्यत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
          तळोद्यात यापूर्वी नागरिकांना रात्रीचा घरफोड्या होण्याचा अनुभव होता. मात्र दिवसा घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात शहादा रोड वरील नवीन वसाहती व गोपाळ नगर मधील नागरिक भीती पसरली आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण व भीती दूर करण्यासाठी चोरट्यांना पकडून रक्कम परत मिळवून देण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे केले आहे.