Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : जामीन अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश

 मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : जामीन अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश  
जळगाव :- फिर्यादी याने वसीम पटेल व इतर, रा. भुसावल, यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे - भुसावळ बाजार पेठ, येथे गुन्हा भा.द.वि. कलम ३२६, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे नोंदविला होता. थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी कि, फिर्यादीची मामी, मोठी आई व इतर उसनवारीच्या पैशांवरून भांडण करीत होते. आरोपींनी सदर ठिकाणी येऊन फिर्यादी यांना भांडणात पडू नको असे सांगून मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. आरोपींनी नातेवाईकांनाही मारहाण केली होती. नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये नेले होते परंतू चक्कर येत असल्यामुळे दवाखान्यात भरती करण्यात आले होते. त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आले होते. परंतु परत त्रास होत असल्याने उपचार कामी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आरोपीची अटक करण्यात आली होती. आरोपीने सदर गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालय भुसावल, येथे जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू,  न्यायालयाने सदर जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध आरोपीने  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, येथे जामीन अर्ज एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत दाखल केले होते.  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती श्री. एस. जी. चपळगावकर) यांनी दिनांक १०.१०.२०२३ रोजीच्या आदेशान्वये सदर जामीन अर्ज अटी व शर्तीसह मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत. आरोपी तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (९५१८३२३७२६) यांनी काम पाहिले.