बांगलादेश मध्ये नित्यानेच सुरु असलेल्या हिंदूंवर अत्याचार हा आपण सोसिअल मीडियावर पाहतच आहोत.तेथील माणुसकीला काळिमा फासणारी पिलावळ ही, हिंदू साधू संतांना त्रास, खोट्या गुन्ह्यात अटक,हिंदूंच्या घरावर दगदफेक,जाळपोळ, हिंदू महिलांवर अमानुष अत्याचार-बलात्कार हे सातत्याने ठरवून करतच आहेत.
आज जागतिक मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून भारतभर मुक मोर्चा काढत, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मुकमोर्चा आणि निदर्शने केले असून, तळोदा शहरात देखील निषेध मुकमोर्चा हा अतिशय शांततेत आणि शिस्तीने सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने काढण्यात आला.
त्यात शहरातील सर्वच व्यापार व्यवसाय करणारे धर्मबंधू,नागराध्यक्ष, नगरसेवक, समाजसेवक,धर्मप्रेमी आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुकमोर्च्यात स्वेच्छेने अनेकांनी हातात धरण्यासाठी फलक बनवून आणले होते.मुकमोर्चा हा दत्त मंदिर, हातोडा रोड येथून सुरु झाला आणि तहसील कार्यालयात गेला नायब तहसीलदार निशा वळवी यांना निवेदन देण्यात आले.