निवेदनाचा आशय असा,तुमच्या माध्यमातून, 'बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध कारवाईची विनंती' केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी,
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद ही देशातील वकिलांची सर्वात मोठी संघटना आहे, जी राष्ट्र आणि समाजाला समोर ठेवून काम करते. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचला पाहिजे, या तत्त्वावर संघटना देशभरात कार्यरत आहे. सर्वांना मानवी हक्क प्रदान करणे हे संघटनेच्या मूळ उद्दिष्टांपैकी एक आहे.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारामुळे अधिवक्ता परिषद अत्यंत व्यथित आहे. अलीकडे बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरांवर आणि घरांवर हल्ले, हिंसाचार आणि छळवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. आपल्या शेजारील देशातील अल्पसंख्याकांना अशा प्रकारच्या छळाचा सामना करावा लागतो हे अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक आहे बांगलादेशातील हिंदू समाजाविरुद्धच्या हिंसक घटना आणि त्यांच्या मूलभूत हक्कांचे होणारे उल्लंघन अत्यंत चिंताजनक आहे.बांगलादेशात संविधानाचा गळा घोटला जात आहे आणि हिंदू समाजाला लक्ष्य केले जाते. बांगलादेशात अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत, ज्यात तोडफोड, मूर्तीची विटंबना आणि जाळपोळ, ५९ टक्के हिंसाचार मंदिरात झाला. पूजेदरम्यान ६९ मंदिरांवर हल्ले झाले.घरांची तोडफोड व लूट हिंदू समाजाच्या घरांची तोडफोड करून त्यांची मालमत्ता लुटण्यात आली आहे.
हिंदू समाजातील लोकांवर हल्ले झाले आहेत आणि अनेक लोक मारले गेले आहेत. १५०० हिंदू शिक्षकांना राजीनामा द्यावा लागला. हिंदू समाजातील लोकांवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात आहे.सरकारी संरक्षणाचा अभावः बांगलादेश सरकार या घटना रोखण्यात अपयशी ठरले असून पीडितांना न्याय मिळत नाही.
आम्ही तुमच्या माध्यमातून केंद्र सरकार, बांगलादेश सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला विनंती करतो की त्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे आणि बांगलादेश सरकारला कडक संदेश द्यावा.
आमच्या मागण्या याप्रमाणे
भारत सरकारः हिंदूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा धर्म आणि संस्कृती पाळण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणावा.बांगलादेश सरकारने हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.
आंतरराष्ट्रीय समुदायाने या समस्येकडे लक्ष द्यावे आणि बांगलादेशातील मानवाधिकार परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावे.
आम्ही आशा करतो की तुमच्या माध्यमातून केंद्र सरकार, बांगलादेश सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदाय आमच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करतील आणि बांगलादेशातील हिंदूच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलतील.असे निवेदनात नमूद केले आहे.