नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विजेच्या पुरवठा वारंवार खंडित होतो तो पूर्ववत सुरू व्हावा या मागणी करिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत तीन मार्च रोजी वीज वितरण कंपनीचा विभागीय कार्यालयात टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी, वीज वितरण कंपनी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गजानन पाटील यांना देण्यात आले व त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. निवेदनावर महानगरप्रमुख पंडित माळी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, उपतालुकाप्रमुख सुनील पवार, उपतालुकाप्रमुख निंबा पाटील, गुड्डू राठोड, गणेश राठोड, आकाश वळवी, अभीसिंग वळवी, गैधल पाटील, संतोष पाटील यांच्या सह्या आहेत.
निवेदनातील विषय असा... नंदुरबार जिल्हयातील ग्रामिण भागात ८ तास खंडीत विजपुरवठा होत असल्याने शेतकरी व ग्रामीण नागरिक त्रस्त असुन रात्रन दिवस विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नंदुरबार मार्केट यार्ड समोरी विज वितरण जिल्हा कार्यालय या ठिकाणी दिनांक ०३ मार्च २०२५ सकाळी ११:३० वाजता शिवसेना उबाठा गट नंदुरबार तर्फे महानगरप्रमुख पंडीत माळी व तालुका प्रमुख रमेश पाटील यांचे नेतृत्वाखाली कार्यालयाला ताळाटोक आंदोलन करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्हयातील ग्रामिण भागात विज पुरवठा MIDC नसतांना देखील दिवसा विज खंडीत करुन रात्र पाळीसाठी शेतीला पाणी भरण्यास विज सोडली जाते. मा. फडणवीस साहेब सरकारने सत्त्येत आल्यावर २४ तास विज पुरवठा करण्यात येईल रात्री पाळीस एकही शेतकऱ्याला शेतावर पाणीमरण्यासाठी वेळ येणार नाही मात्र आश्वासनाचे पालन होत नसल्याने व ८ तासातही खंडीत विज पुरवठा पुरविला जात असल्याने व कर्मचाऱ्यांचा अरेरावी व मुजोरी यांना जनता व शेतकरी वर्ग त्रस्त आहेत. विज पुरवठा सुरळीत नसल्या कारणाने शेतीलाल सिंचन करणे त्रासदायक आहे. पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही, रात्री हिस्त्र प्राण्याचा उपद्रव अश्यातच शेतकऱ्यांना जिव धोक्यात घालुन पिकांना रात्रीच्यावेळीस पाणी देण्यासाठी जावे लागते. सदरील परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचा कोणीही वाली नसल्याचे शेतकऱ्यांचा जिवही व पिकही धोक्यात आलेले आहेत. आधीच ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात असल्या कारणाने नंदुरबार उबाठा गटा मार्फत वेळोवेळी आंदोलने करुन निवेदनाव्दारे समज देवुनही विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी सकाळी ठिक ११:३० वाजता "टाळाठोक आंदोलन" करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.