निधीमधून इतर योजनांकरीता वळविण्यात आलेला निधी पुन्हा आदिवासी विकास विभागाला वर्ग करणेबाबतचे निवेदन विश्व आदिवासी सेवा संघटनेने मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
निवेदनाचा आशय असा महाराष्ट राज्याच्या मागील व चालु अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले, याबददल आपले सपुर्ण आदिवासी समाजातर्फे हार्दिक आभार. यामुळे आदिवासी समाजाच्या सर्वागिन विकासासाठी भरपूर मदत होणार आहे. समाजातील दुर्बल घटकांचा विकास करणे हे यातून दिसून येते. परंतु सदर मंजूर निधीमधुन आपल्या प्रतिष्ठीत व आपल्या सरकारच्या सर्वांत महत्वाच्या माझी लाडकी बहिण योजना राबविणेकामी सात हजार कोटी रुपयांचा निधी सदर योजनेकरीता वर्ग करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सदर योजना ही तात्कालीक असून देखील सदर योजनेकरीता आपण पुर्वनियोजित आदिवासी समाजाच्या विकासासाठी उपलब्ध निधीतील तरतुदीबा विचार न करता या योजनेकरीता निधी वळविणे म्हणजे एक प्रकारे गरीव दुर्बल असलेल्या आदिवासी समाजावर अन्याय केल्यासारखे होईल.
महोदय आपणास ज्ञात आहे की, आदिवासी समाज हा दुर्गम व रानावनात राहून आपली संस्कृती जपणारा समाज आहे. त्याला अन्याय राजकारण यातले काही कळत नाही. परंतु असे त्याच्या निधीवर दुस-या योजनेचे भवितव्य किती दिवस अवलंबून
राहणार आपली माझी लाडकी वहिण योजना ही अदिवासी समाजापेक्षा आणि त्यांच्या विकासापेक्षा नक्कीच मोठी असून शकत नाही. तथापि आपण या योजनेकरीता वर्ग केलेला निधी तात्काळ पुनश्च आदिवासी विकास विभागास वर्ग करावा तसेच माझी लाडकी बहिण, माझा लाडका भाडु सारख्या व्यर्थ योजना तात्काळ बंद कराव्यात जेणेकरुन सरकारचे व पर्यायाने सामान्य नागरिकांच्या घामाचा पैसा सत्कारणी लागेल.
सदर निधी तात्काळ वर्ग करावा व आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय थांबवावा. अन्यथा आदिवासी समाज याविरोधात राज्यभर आंदोलन करुन सरकारला त्यांनी केलेल्या चुकीच्या निर्णयाबाबत माफी मागायला लावेल, याची नोंद घ्यावी
निवेदनावर जितेंद्र टी बागुल केंद्रीय संस्थापक तथा अध्यक्ष संभाजी आर जगताप केंद्रीय संस्थापक सचिव विनायक के गावीत केंद्रीय संस्थापक सहसचिव अँड कोमल जे पावरा केंद्रीय संस्थापक सल्लागार गुलाब एस गावीत केंद्रीय संस्थापक कोषाध्यक्ष जितेंद्र जी तडवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश जी सोनवणे नंदुरबार तालुका अध्यक्ष सतिष पी भुसावरे नंदुरबार तालुका सचिव कालूसिंग डी वळवी धडगांव तालुका अध्यक्ष अँड गीतांजली वाय पाडवी धडगांव तालुका सल्लागार निवेदनावर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत