नंदूरबार दि २२(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संचाच्या वाटपाचा कार्यक्रम नंदूरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ हिनाताई गावित व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
खा डॉ हिनाताई गावित व पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षिततेच्या संचाचं वाटप माझ्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलतांना डॉ हिनाताई म्हणाल्या, बांधकाम ही काळाची गरज आहे आणि तुम्ही सगळे कुशल कामगार आहात त्यामुळे सुरक्षिततेच्या उपायांची योजना केल्याशिवाय उंचावर चढून वेडावाकड्या ठिकाणी उतरून बांधकाम करणे हे तुमच्या कुटुंबासाठी आणि एकूणच घातक ठरू शकतो. त्यामुळे सुरक्षा संचाचा वापर जरूर करावा, कारण तुमच्या घामावरती इमारती उभ्या राहतात असं मत यावेळी व्यक्त केलं.