Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रापापूर ता तळोदा येथे चक्रीवादळ व पावसामुळे ग्रामस्थांचे नुकसान, प्रशासनाने पंचनामा करावा - प.स.माजी ठाकरे

तळोदा दि २०(प्रतिनिधी)रापापूर ता तळोदा येथे दूपारी अचानक चक्रीवादळ व गारपीट,पावसामुळे अनेक घरे छपरांची पडझड व शेतीचे पिकाचे व पंचवीस ते तीस शेळ्या मृत्यूमुखी पडून नुकसान झाले आहे.लक्कडकोटच्या नदीला पूर आला होता.पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे यांनी प्रशासनाने पंचनामा करण्याची मागणी केली आहे.
आज दि २० रोजी दूपारी अचानक चक्रीवादळ सूरू झाले.पाठोपाठ जोरदार पाऊसाने परिसर जलमय झाला.वादळामूळे शेतकऱ्यांचा अंगणात असलेल्या वस्तू भिजल्या तर काही उडून गेल्या ,हवेचा जोर इतका होता की, अनेक घरांची छपरे, घरावरील पत्रे उडून गेले.अंगणात उभ्या केलेल्या मोटरसायकली हवेत या अंगणातून त्या अंगणात फरफटत गेल्या.एका शेतकरीचे बैल पत्र्याच्या शेडमध्ये होते.ते शेड बैलांच्या अंगावर कोसळले गावकऱ्यांचा मदतीने बैलांची सूटका करण्यात आली.अनेकांचे छप्पर उडाल्याने घरातील शेतमाल,घर संसाराचा वस्तू भिजून नूकसान झाले आहे.प्रशासनाने पंचनामा करावा अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे यांनी केली आहे.