तळोदा दि २१(प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मालदा ता तळोदा येथे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना मुग बियाण्याचे वाटप करण्यात आले.
केंद्र सरकार पुरस्कृत सन २००७-०८ पासून राज्यात अन्न सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शेतीच्या लागवडीसाठी आवश्यक असणारी बियाणे पुरविण्यात येते . बियाणे चांगल्या दर्जाचे असतील तर शेतीतून निघणारे उत्पन्न हि त्याच प्रतीचे निघते, त्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी हि योजना सुरू केली आहे.
मालदा ग्रामपंचायत कार्यायलात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत पीक प्रात्यक्षिक कडधान्य मूग बियाणे २५ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले,यावेळी गोपी पावरा,मंडळ कृषी अधिकारी श्रीमती वसावे ,कृषी पर्यवेक्षक श्री माळी ,कृषी सहायक विकास पाडवी,गणेश कदम,रोजगार सेवक संतोष ठाकरे,फकीरा खर्डे,रतीलाल खर्डे, संजू खर्डे,हेमंत ठाकरे,रायसिंग खर्डे,आदि लाभार्थी उपस्थीत होते,