जेजुरी गडावरून हूंकार शासन सामान्यांचा दारी
सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते #शासकीययोजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
लोकांचे जीवन सुखी करून त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेऊन निर्णय घेण्यात येत आहेत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लाभ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षभरात ३५ #सिंचन योजनांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे ६ ते ७ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासनाने घेतले. ग्रामीण भागाला सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
. गावापर्यंत समृद्धी देण्याचा निर्णय #प्रधानमंत्रीनरेंद्रमोदी यांनी घेतला, त्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्याला नवीन विमानतळाची आवश्यकता आहे. येथील #उद्योग , #शेती अशा सर्वांनाचा याचा फायदा होणार आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. विकासासाठी महामार्ग महत्त्वाचे असून #पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.