वन्यप्राणी बिबट यांचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने उपवनसंरक्षक
मेवासी वनविभाग तळोदा, यांना पत्र दिले असुन अंमलबजावणी न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनाचा आशय असा,दि.२ डिंसेबर २०२४ रोजी मौजे दलेलपुर ता.तळोदा जि. नंदुरबार येथील अकरा वर्षीय बालकावर शेतात कापुस वेचणी करीत असतांना वन्यप्राणी बिबट या हिंस्र प्राण्यांने हल्ला करीत जिवंत ठार केले असुन जिल्हयात सात ते आठ निष्पाप बालकांचा मृत्यु झालेला आहे. मानव व बिबट यात संघर्ष सुरु असल्याने जिल्हयात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर घटना ज्या ज्या परिमंडळामध्ये होत आहेत त्या त्या ठिकाणी वनपरिमंडळ अधिकारी हे वन्यप्राणी उपद्रव असल्याने नियमीत गस्त करीत आहेत कि नाही याबाबत नागरीकांमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत तेव्हा तात्काळ आपल्या स्तरावरुन सदरच्या परिमंडळात, नियतक्षेत्रात वनपाल, वनरक्षक यांचे रात्रदिवस गस्त मारल्याबाबतचे जीओटॅग फोटो मागविण्यात यावे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनपाल, वनरक्षक यांना वेळोवेळी सुचना, पत्रव्यवहार केलेले जा.क्र निहाय योग्य ती चौकशी करण्यात यावी तसेच कर्तव्यात कसुर करण्यात आलेल्या बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
नंदुरबार जिल्हयात वन्यप्राणी बिबट या हिंस्र प्राण्यांचे वन्यजीव संवर्धन केंद्र तात्काळ उभारण्यात यावेत व वन विभागामार्फत वन्यप्राणी सुरक्षितेसाठी जनजागृतीकामी उपाययोजना करण्यात यावे तसेच वरील नमुद घटनेनंतर सदरच्या कुटुबांला तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी. उपरोक्त निवेदनाचा दहा दिवसाच्या आत आपल्याकडुन योग्य कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, महासचिव सुधीर वळवी,राज्य कोषाध्यक्ष ईश्वर वसावे यांच्या सह्या आहेत.निवेदनाची प्रत मुख्य वनसंरक्षक वनविभाग धुळे, जिल्हाधिकारी नंदुरबार यांना पाठवण्यात आली आहे