Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जय श्रीराम सोशल ग्रुपतर्फे तळोदाचे पालिका मुख्याधिकारी यांना शहरातील समस्यांचे निवेदन

तळोदा दि २८ (प्रतिनिधी)शहरातील मूलभूत सुविधांची दुर्दशा व नगरपालिकेच्या दुर्लक्षाविरोधात तळोदा जय श्रीराम सोशल ग्रुपतर्फे तळोदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
                       या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहरातील सार्वजनिक सुविधा व विकास कामांसाठी लाखो रुपये खर्च केले गेले असले तरी त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. जनतेच्या करातून उभारलेली ही सुविधा दुर्लक्षित राहून निष्क्रिय व अनुपयोगी बनल्या आहेत. विशेष म्हणजे प्रशासक बसल्यानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. या संदर्भात खालील विषयांकडे त्वरित लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्यात उद्यानाचा मृत्यू, लाखो रुपये खर्च असूनही दुर्दशा, शहरातील सार्वजनिक उद्यान वाया गेले असून ते वापराविना जीर्णावस्थेत आहे. उद्यानाची दुरुस्ती व देखभाल होणे गरजेचे आहे. वैकुंठ रथ निष्प्रभ, उपयोगाअभावी लाखो रुपये वाया, लाखो रुपये खर्च करून उभारलेला वैकुंठ रथ निष्क्रिय आहे, त्वरित वापरासाठी कार्यवाही करण्यात यावी, आदिवासी सांस्कृतिक भवन, सर्वसामान्यांसाठी न परवडणारे, तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचा वापर सामान्य लोकांना परवडत नाही. दर कमी करणे व सर्वांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 
                    ज्येष्ठ नागरिक हॉल दुर्लक्षामुळे दुर्गवस्थेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेला हॉल आज निष्क्रिय अवस्थेत आहे याची योग्य देखभाल व व्यवस्थापन तातडीने केले जावे.
शौचालये आणि स्वच्छता लाखो खर्च असूनही हायजिनचा अभाव, शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. स्वच्छतेसाठी नियमित उपाययोजना कराव्यात. पथदिव्यांची अंधारलेली कहाणी, लाखो रुपये वाया शहरातील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पथदिव्यांचे त्वरित दुरूस्तीकरण करावे. नगरपालिकेचा निष्काळजीपण, कचऱ्याचे साम्राज्य आणि गटारांची दुर्दशा, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग व गटारांची नासधूस झाली आहे. आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे. 
                       पाच कंदीलांची ओळख धूसर, ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित, शहरातील ऐतिहासिक पाच कंदील बंद झाले आहेत ज्यामुळे वारशाची ओळख नष्ट होत आहे. यास पुन्हा जिवंत केले जावे. प्रवेशद्वारे अंधारात, ऐतिहासिक स्मारकांची उपेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज व अन्य ऐतिहासिक प्रवेशद्वारांवरील पथदिवे बंद आहेत यामुळे शहराचे वैभव हरवत आहे. वरील सर्व समस्यांबाबत तातडीने कारवाई करुन नागरी सुविधांचा दर्जा उंचावावा. प्रशासकाच्या कार्यकाळात परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे यासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा जनतेला एकत्रित करून आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल. तरी कृपया या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी व योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन देण्यात आले.
                      निवेदन देतेवेळी तळोदा जय श्रीराम सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष अमन मोहनसिंग जोहरी, कार्तिक शिंदे, राहुल जैन, योगेश चौहान, पारस परदेशी, कल्पेश जोहरी, राहुल परदेशी, किरण ठाकरे, भरत भोई आदी जय श्रीराम सोशल ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.